सांगली
किरकोळ वादावादीने जीवनाचे मातेरे होते. वेळीच रागावर नियंत्रण ठेवले तर पश्चातापाची वेळ येत नाही, पण अलिकडे कोणाजवळच संयम उरलेला नाही. किरकोळ कारणातून एखाद्याचा जीव घ्यायलाही कोणी मागे-पुढे पहात नाही असे सध्याचे भीषण चित्र आहे. सांगलीत हॉटेलच्या बाहेर भांडण झाले अन् एका युवकाने वयोवृद्ध इसमास लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण करून जखमी केले. त्याचे डोके जमिनीवर आपटले. या वयोवृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात सुरेश राजाराम पाटील यांच्या खुनाचा गुन्हा नोंद होवून रोहित आनंदा माळी याला अटकही करण्यात आली. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात…